Sunday, March 30, 2014

फिजीतील भारतीय वंशीयांचे अस्तित्व धोक्यात ( दै. सामना - २० जून २०००)

लेखाचा मूळ भाग.



लेखाचा उर्वरित भाग.




फिजीतील भारतीय वंशीयांचे अस्तित्व धोक्यात

फिजीतील राजकीय संघर्ष वांशिक वादातून निर्माण झाला आहे. फिजीच्या लोकसंख्येपैकी ४४ टक्के भारतीय वंशीय नागरिक आहेत. रोजगारासाठी व व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांचे फिजीमध्ये १६व्या शतकापासून स्थलांतर सुरु झाले. फिजीयन जनता आणि हे भारतीयवंशीय यांच्यातील सामाजिक समरसता काही वर्षे टिकली. त्यानंतर मात्र वांशिक भेद उफाळून आले असून तेथील भारतीय वंशीयांचे अस्तित्व धोक्यात आले होते. या स्थितीसंदर्भात दै. सामनाच्या २० जून २०००च्या अंकात मी हा लेख लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिलेली आहे.

-           -समीर परांजपे
-              paranjapesamir@gmail.com

या विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक घटकाचा अंतकाळ असतो. मग तो घटक मानवनिर्मित असो किंवा निसर्गनिर्मित. जगातील आत्तापर्यंतच्या सर्व युद्धांचा इतिहास पहा – सिकंदर, नेपोलिअन बोनापार्ट, हिटलर, मुसोलिनी यासारख्यांनी जग जिंकण्याचे स्वप्न पाहिले. त्यांना प्रारंभी काही यशही मिळाले. परंतु अखेर ते आपापल्या देशापुरते मर्यादित राहिले. ही उदाहरणे समोर असूनही काही जणांची वसाहतवादी वृत्ती तसेच सम्राट बनण्याची खुमखुमी संपत नाही. आजवर जगाचा नकाशा हा भौगोलिक घडामोडींमुळे जसा बदलला तसा माणसाच्या इच्छा-आकांक्षांनीही तो बदलला. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका- रशिया असा दोन खणी जगाचाच नकाशाच रेखाटणारे आता रशियाच्या विघटनानंतर अमेरिकेच्या बाजूला कलताना दिसत आहेत. महाशक्ती होऊ घातलेल्या भारत, चीन या देशावर जसा या घटनांचा परिणाम होतो तसा तो श्रीलंका, मालदीव, अगदी फिजी यासारख्या छोट्या देशांवरही होत आहे,
जागतिकीकरणाच्या काळात जग संकुचित झाले आहे, असे आपण सातत्याने म्हणत असतो. पण व्यापार-उदीमाच्या निमित्ताने एका देशातून दुसर्या देशात स्थलांतर करणारी माणसे आपली पाळेमुळे, संस्कृतीही आपल्याबरोबर घेऊन जात असतात. सध्या वृत्तपत्रांत चर्चेचा विषय झालेला फिजी हा देशही यामुळे भारताच्या जवळ जोडला गेलेला आहे. पॅसिफिक समुद्रामध्ये आँस्ट्रेलियाच्या जवळ फिजी देश आहे. फिजी हा छोट्या छोट्य़ा बेटांचा बनलेला देश भारताच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे. भारताचा इतिहास हा बर्याचदा लढाईत हरण्याचाच असला तरीही पहिल्या व दुसर्या महायुद्धात आपल्या देशातील सैनिकांनी ब्रिटिश लष्करातून लढताना लक्षणीय कामगिरी बजावली होती. साधारणत: १६व्या शतकामध्ये फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज, स्पॅनिश व्यापारी भारतात व्यापाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर आले. व्यापार करता करता त्यांनी एकेका भूभागावर आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. सत्तेबरोबरच तिथल्या प्रदेशातील लोकांना संस्कृतीविहीन करण्याचा प्रयत्न यापैकी पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर केला.
भारताचे फार पूर्वीपासून सागरी मार्गाने अनेक प्रदेशांशी व्यापारी संबंध होतेच. परंतु युरोपातील या गोर्या बंधुंच्या व्यापारी शिस्तीमुळे अनेक नवीन प्रवाह भारतात येऊ शकले. यातून भारतातील अनेक लोक मोठ्या प्रमाणावर जुलमाने किंवा स्वखुशीने परकीय देशांमध्ये रोजगारासाठी या व्यापाराच्या निमित्ताने जाण्यास सुरुवात झाली.
पॅसिफिक महासागरातील फिजी या बेटावरील लोकसंख्या आज आठ लाखाच्या आसपास आहे. त्यातील ४४ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. म्हणजे साडेतीन लाख लोक पूर्वी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागांतून ज्याप्रमाणे माँरिशससारख्या देशात मजूर म्हणून तेथे गेले होते तसेच फिजीमध्ये देखील असेच भारतीय लोकांचे स्थलांतर १९व्या शतकात मोठ्या प्रमाणावर झाले होते. या ठिकाणी मोलमजूरी करता करता इतक्या वर्षांनी हे भारतीय फिजीचे अविभाज्य अंग बनले होते. फिजीमध्ये मुख्य उत्पादन उसाचे आहे. साधारणत: १८८० ते १९२० या ४० वर्षांच्या काळात भारतीय नागरिक मजूर म्हणून फिजी येथे येण्याची प्रक्रिया सुरु होती.
प्रथम मजूरी करुन मग फिजी देशाचा महत्त्वाचा घटक होण्यापर्यंत भारतीय नागरिकांनी केलेला प्रवास सहजगत्या घडलेला नाही. १९१०च्या सुमारास साम्राज्यशाहीचे धोरण जेव्हा तळपत होते तेव्हा फिजीतील भारतीय नागरिकांवर तेथील ऊसमळेवाल्यांनी अनन्वित अत्याचार केलेले आहेत. पण आपल्या लोकांची प्रवृत्ती ही संग्राही वृत्तीची असते. टक्केटोणपे खाऊन देखील भारतीय नागरिकांनी फिजीमध्ये स्वतचा व्यवस्थित उत्कर्ष करुन घेतला आहे. फिजीमध्ये आज जो उच्च मध्यमवर्ग आहे त्यात मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक आहेत. फिजी देशाला जी थोडीफार समृद्धी मिळाली ती भारतीय लोकांनी दाखविलेल्या उद्यमशीलतेमुळे आहे.
जगात आहेरे आणि नाहीरे यांचा संघर्ष सुरु असतो. त्यामध्ये नाहीरे वर्ग आहेरे वर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फिजीमध्ये भारतीय नागरिक नाहीरे वर्गात मोडत होता. त्याला संपन्नतेची ओढ लागलेली होती. आज स्थिती अशी आहे की, फिजी देशाचा मूळ रहिवासी या भारतीय नागरिकांचा व्देष करु लागला आहे. हाँगकाँग, सिंगापूरमध्ये दुसर्या महायुद्धात ब्रिटिशांनी जेव्हा लढाई छेडली तेव्हा ब्रिटिश सैन्यातून लढणारे अनेक सैनिक फिजीत गेले होते. कालांतराने ते तिथेच राहिले. यातले अनेक जण व्यापारी बनले. फिजीच्या लोकसंख्येपैकी ४४ टक्के असलेले भारतीय लोक तोपर्यंत कोणालाही डाचत नव्हते. मूळची आदिवासी असलेली पण पाश्चिमात्या वळणामुळे सुसंस्कारित नागरी आयुष्य जग लागलेली फिजियन जनता व हे `विदेशी भारतीय यांच्यात हळूहळू सामंजस्याचे व्यवहार होऊ लागले. ही सामाजिक समरसता काही वर्षे व्यवस्थितपणे टिकली. याचीच परिणती म्हणून १९९१च्या निवडणूक फिजीमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी पंतप्रधानपदी निवडून आले. आता महेंद्रसिंग चौधरी यांचे मूळ ठिकाण शोधायचेच तर हरयाणा राज्यामध्ये सापडू शकेल. फिजीमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांतूनही पूर्वी बरेचसे लोक गेलेले आहेत. पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी यांनी चालविलेला कारभार हा केवळ भारतीय वंशीयांच्या हिताच्या बाजूने झुकतो आहे अशी फिजीतील मूळ लोकांची भावना होऊ लागलेली होती.
पहिले व दुसरे महायुद्ध असो किंवा शीतयुद्धाचा काळ, जगातील महाबलाढ्य सत्तांना आपल्या लष्करी हालचालींसाठी विविध तळांची गरज भासते. फिजीदेखील बलाढ्य राष्ट्रांचा असाच एक लष्करी तळ पूर्वीपासूनच होता. आज बदलत्या काळात आरमारापेक्षा हवाई दलाला अधिक महत्व आलेले आहे. सागरी किनार्यांचे रक्षण करणे ही महत्वाची बाब असल्याने नौदलाचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु सागरी बेटांकडे मोक्याची ठाणी म्हणून पूर्वी जसे बघितले जात असे तसे महत्व आता राहिलेले नाही. फिजीचे जगाच्या नकाशावरील महत्व यामुळेही कमी झालेले होते. दुसर्या बाजूला फिजीचे आर्थिक सामर्थ्य आतापर्यंत ऊसाच्याच पिकावर अवलंबून होते. फिजीचा प्रदेश निसर्गसंपन्न असल्याने या बेटावर अमेरिकन पर्यटकांसहित अनेकजण सध्या येत असतात. त्यामुळे फिजीच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच हातभार लागला होता.
पण जागतिकीकरणाची प्रक्रिया ही कोणत्याही देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठेवण्यास मान्यता देत नाही. फिजीमध्ये ऊसाचे विक्रमी पीक यंदा आले असून त्या ऊसाला परदेशी बाजारपेठेत फारशी मागणी नाही. याचे कारण जगातील ऊस उत्पादक देशांमध्येच ऊसाचे पीक यंदा मोठ्या प्रमाणावर आलेले आहे. त्यातून साखरेचेही विक्रमी उत्पादन झालेले आहे. याचा सरळ तडाखा ऊस न विकल्या गेलेल्या शेतकर्यांला व त्यावर अवलंबून असलेल्या मूळ फिजियन मजुराला बसला आहे. या गोष्टीमुळे भारतीय वंशीय पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी यांना मूळ फिजियनांच्या असंतोषाला बळी पडावे लागले. मूळ फिजियन असलेल्या जाँर्ज स्पाईट या व्यक्तीने चौधरींच्या विरोधात पुंडावा केला आहे. जाँर्ज स्पाईट हा फिजीवादी व विरोधी पक्षनेते सँम स्पाईट यांचा मुलगा. जाँर्ज स्पाईटच्या पाठिराख्यांनी सशस्त्र सैनिकांच्या मदतीने चौधरी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांना संसद इमारतीतच १९ मेला जेरबंद करुन ठेवले. फिजीमध्ये आजपासून बरोबर १३ वर्षांपूर्वी भारतीय वंशीयांचे वर्चस्व असलेले सरकार फिजीवादी नेत्यांनी उलथले होते. आता नव्या बंडखोराच्या रुपात आलेल्या जाँर्ज स्पाईट यांनी फिजीमध्ये आणीबाणी लागू केली आहे.
जाँर्ज स्पाईट यांच्या समर्थक सशस्त्र रक्षकांनी संसद इमारतीत कोंडलेल्या पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी व त्यांच्या समर्थकांना २१ मे रोजी जोरदार मारहाण केली होती. चौधरी यांच्यावर सातत्याने राजीनामा देण्यासाठी स्पाईट समर्थक दबाव आणत होते. याच्या परिणामी चौधऱींचा मुलगा राजेंद्र याने पंतप्रधानांच्या बंडखोरांचा सचिवपदाचा राजीनामा बंडखोरांकडे पाठवून दिला होता. या बंडखोरांची मजल फिजीचे राष्ट्रपती रातू सर कामिसेसे मारा यांचाही राजीनामा मागण्यापर्यंत गेली होती. भारतीय वंशीयांविरुद्ध आम्ही वांशिक युद्ध लढण्यास तयार आहोत अशी भाषाही जाँर्ज स्पाईट समर्थकांनी केली होती.
फिजीचे राष्ट्रपती रातू सर कामिसेसे मारा यांची परिस्थिती विचित्र झालेली आहे. जाँर्ज स्पाईट याने केलेल्या बंडाचा शेवट कसाही होवो, पण पदच्युत पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी आता या पदावर पुन्हा विराजमान होण्याची शक्यता नाही हे मात्र नक्की. राष्ट्रपती रातू सर कामिसेसे मारा यांनीही फिजियन अस्मिता आठवून भारतीय वंशीयांचे असलेले सरकार पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नाही असा निर्धारच केला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचे मध्यस्था सितीवेनी राबुका यांनी यशस्वीपणे माघार घेऊन बंडखोरांचा प्रस्ताव जवळजवळ मान्यच केला.
सितीवेनी राबुका यांचा इतिहासही संशयास्पदच आहे. १९८७मध्ये याच राबुकांनी दोन बंडांचे नेतृत्व केले होते. १९९७मध्ये फिजीची घटना तयार झाली. पण महेंद्रसिंग चौधरींनी राबुका यांना गेल्या वर्षीच्या निवडणुकीत धुळ चारली होती. भारतीय वंशाच्या व्यक्तीस फिजीचा पंतप्रधान होऊ द्यायचे नाही अशी घटनादुरुस्ती १९९०मध्ये फिजी राज्यघटनेत करण्यात आली होती. परंतु लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या भारतीय वंशीयांनी बहुमताच्या जोरावर ही घटनादुरुस्ती रद्द केली होती. पंतप्रधानपदी चौधरी विराजमान झाले. त्यामुळे फिजीवाद्यांचा असंतोष धुमसत राहिला होता. सुवा ही फिजीची राजधानी. भारतीय वंशाच्या नागरिकांच्या घरांची, मालमत्तेची मोठ्या प्रमाणात जाळपोळ एव्हाना फिजीवाद्यांनी केलेली आहे. लष्कराने मोक्याच्या जागांवर ताबा मिळविला असला तरी जनमानसात चौधरींच्या विरोधात जणू विरोधाची लाटच उसळली आहे.
जाँर्ज स्पाईट या बंडखोराने मूळ फिजियन नागरिकांच्या हक्काचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यावर राज्यघटनेनूसार तोडगा काढला जाईल असे फिजीचे राष्ट्रपती रातु सर किमिसेसे मारा सांगत आहेत. भारतीय वंशीय नागरिक फिजीमध्ये ४४ टक्के असले तरी सध्या त्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. फिजीमध्ये १९ मेपासून पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरींच्या विरोधात जे बंड झाले त्यावेळेपासून त्यांचे प्राण संकटात होतेच, शिवाय आँस्ट्रेलिया व भारत या दोन देशांनाही फिजीच्या राजकीय स्थितीच्या चिंतेचा भार वाहावा लागला आहे.
भारतीय वंशीयांचे प्राबल्य असलेले सरकार नजीकच्या काळात तरी फिजीमध्ये अस्तित्वात येणे कठीणच दिसते. पण यानिमित्ताने दोन प्रश्न उपस्थित झाले आहेत. श्रीलंकेत तामिळींचा स्वत:च्या अस्तित्वासाठी सुरु असलेला झगडा, युरोपियन देशांमध्ये भारतीय नागरिकांविरुद्ध गोरे लोक चालवित असलेली पद्धतशीर मानहानीची मोहिम, अमेरिकेत भारतीय मिळणारी सापत्नभावाची वागणूक या घटनांना आपण पायबंद घालणार कसा



No comments:

Post a Comment